मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बंद काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५० जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद असताना शहरात विविध ठिकाणी काही तरुण विनाकारण दुचाकीवरून फिरत असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले होते.
रविवार व सोमवारी या दोन दिवसात ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले . तसेच त्यांना नोटिसा बजावून ताकीद देण्यात आली . अत्यावश्यक असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे शासनाचे आदेश आहेत . मात्र , तरीही बंद पाहण्यासाठी विनाकारण काही तरुण शहरातील विविध भागात भटकंती करीत होते . अशा काही तरुणांना पोलिसांनी प्रसाद दिला तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज