मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,लवंगीच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब,वैध्यमापन निरीक्षक पथकाने ऊस वजन काट्याची केली तपासणी
भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,या ग्रुपच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीकडे पाहता कारखान्याचे संस्थापक चेअरमन जलसंधारण मंत्री आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, चेअरमन शिवाजी सावंत हे साखर कारखाना चालवत असताना फक्त ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करीत आलेले आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे फलित म्हणजे लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखाना सर्वांगीन प्रगती करीत आहे असे मनोगत कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी व्यक्त केले.
वैध्यमापन विभागातील भरारी पथकाने अचानक लवंगी येथील भैरवनाथ शुगर या कारखान्याचे ऊस वजनाच्या काट्याची तपासणी व पडताळणी केली. वैध्यमापन अधिकार्यांनी विविध प्रकारे वजन मापे ठेवून तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहनांचे रिकामे व भरलेले वजन केले.
ऊस वजन काट्यामध्ये फरक आढळून आला नसल्याचा शेरा काटा इंस्पेक्टर एम.आर. कांबळे यांनी दिला. मागील सहा वर्षापासून भैरवनाथ साखर कारखान्यास ज्या विश्वासाच्या जोरावर ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस देत आहेत त्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाला असल्याची भावना व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी व्यक्त केली तसेच चालू हंगामात एक लाख दहा हजार गाळप झाले असून दोन लाख गाळप पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवले असून शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे अवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, जनरल मॅनेजर(टेक) दिलीप जाधव, जनरल मॅनेजर(प्रो) अनिल पोरे , केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी, ऊस पुरवठा करणारे शेतकरी व वाहतुकदार उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज