मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचा प्रार्दुभावाने शेतकरी व संपूर्ण शेती व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. त्यातच संचार बंदी व लॉकडाउन यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे कारण सध्या शेतकऱ्यांनचा गहू , हरभरा , मका , काढणी चालू आहे . यासाठी मळणीयंत्र उपलब्ध नाही कारण त्याला डिझेल मिळत नसल्याने मळणीयंत्र बसून आहेत . एकतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान केले आहे.आणि सध्या राणात असणारी ही पिके मळणी करण्यावाचुन रानात पडुन आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांनी करावयाचे तरी काय.प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांनचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकऱ्यांनमधून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज