मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
या वर्षीच्या जानेवारी महिन्यात देशातील सहा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले .एकाच महिन्यात इतक्या मोठ्या प्रम णात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणे हा नवा विक्रमच आहे , अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली .
जागतिक पोटॅटो परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की , विशिष्ट अन्नधान्य आणि काही खाद्यपदार्थांच्या निर्मितीत भारत जगातील तीन अव्वल देशांपैकी एक ठरला आहे . शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम आणि सरकारच्या योजना यामुळेच हे शक्य झाले आहे . २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी आपल्या सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत .
या उपायांना यश येणार आहे . शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणे हा तात्पुरता उपाय आम्हाला मान्य नाही , त्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर आम्ही भर दिला आहे . याचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे , तर त्यांच्या भावी पिढ्यांनाही होणार आहे , असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज