मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या चार शहरांमध्ये लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमधील सरकारने ह़ॉटेल, सलून, मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण यानंतर मोठ्या प्रमाणात लोकं आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. जे चिंतेचं कारण बनलं आहे. कारण यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. मुंबईतून मोठ्या प्रमाणात रेल्वेने लोकं प्रवास करुन आपल्या गावी जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आहे तेथेच थांबवण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. याला अनेकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचे ठरवले आहे. कारण कोरोनाच्या विरोधात लढायचे असेल तर सध्या हाच एक उपाय आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आज पुन्हा जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज