मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बहुचर्चित आयपीएलचे अधांतरी असलेले भवितव्य आता आणखी गडद होण्याची शक्यता आहे.उद्या मंगळवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सर्व संघमालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून पुढील धोरण ठरविणार आहे.
देशात प्रवेश केलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. तो कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत . केंद्र सरकारसह राज्य सरकारेही उपाययोजना करत आहेत . या पार्श्वभूमीवर आयपीएल न होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार यंदाची आयपीएल २९ मार्चपासून सुरू होणार होती.
परंतु केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत कोणालाही व्हिसा न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता . बीसीसीआय आणि सर्व संघमालकांची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती . त्यात हा निर्णय घेण्यात आला होता . कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीसीसीआयचे मुंबईतील कार्यालयही बंद करण्यात आले आहे . सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्यामुळे येत्या गुरुवारी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाईल , असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज