टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोणत्याही शासकीय विकास कामांचे उदघाटन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते किंवा उपस्थितीत करणे शासनाच्या राजशिष्टाचार नुसार बंधनकारक आहे. आ.समाधान आवताडे यांचे हस्ते सभामंडपाचे उदघाटन करून मंगळवेढा नगरपरिषदने राजशिष्टाचाराचे पालन केले असून
आ.समाधान आवताडे यांच्यावर टीका करणाऱ्यांना ज्या ज्य नेत्यांनी खांद्यावर घेतले, त्यांच्याच कानात…. अजित जगताप यांचे व्यक्तिमत्त्व आहे अशी खणखणीत प्रत्युत्तर भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल यांनी दिले आहे.
मंगळवेढा शहरातील कल्याणप्रभू देवस्थान समोर जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून शासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजशिष्टाचार नुसार लोकप्रतिनिधींचे हस्ते शासकीय कामाचे उदघाटन करणे प्रोटोकॉल असून आजपर्यंत वासरात लंगडी गाय शहाणी असणाऱ्या अजित जगताप यांना राजशिष्टाचार विषयी ज्ञान नाही.
त्यामुळे उदघाटन समारंभात खाजवून खाजवून खरूज समारंभात रूपांतर करून मनस्ताप करून घेतला आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून अजित जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कधीही तोंड उघडले नाही. आमदार शिवाय कोणालाही बोलूच देत नाहीत अशी आजपर्यंतची जिल्हा नियोजन समितीची परंपरा आहे.
त्यामुळे त्यांनी निधी मंजूर करून आणला म्हणणे एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने भारत सरकारचे परराष्ट्र धोरण ठरवल्या सारखे आहे.
माजी नगरसेवक अजित जगताप यांचे नगरपरिषद राजकारणात माजी नगराध्यक्ष रतनचंद शहा नेते होते, त्यानंतर सुभाष शहा त्यांचे नेते झाले,
विधान सभा मतदार संघात प्रा.लक्ष्मण ढोबळे होते, सन २००४ साली माजी आमदार डॉ. राम साळे नेते होते , सन २०० ९ साली विजयसिंह मोहिते – पाटील नेते होते,
सन २०१४ साली आ.भारत भालके नेते होते , सन २०१४ साली नगरपरिषदेत राहूल शहा नेते होते , सन २०१ ९ साली माजी आमदार प्रशांत परिचारक नेते होते ,
आता सन २०२२ चालू हंगामात कोणाच्या संपर्कात आहेत ? अद्याप स्पष्ट नाही , राजकाणात ज्या नेत्यांनी त्यांना खांद्यावर घेतले , त्यांच्याच कानात उताणखाटपणा अजित जगताप यांनी आपल्या कृतीतून दाखविलेले वास्तव आहे.
ज्या त्यामुळे आ.समाधान आवताडे यांच्यावर टीका टिपण्णी करून मला नेता म्हणा हे दाखवण्याचा खटाटोप त्यांनी थांबवावा,
आता मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील कोणताही नेता त्यांना आपल्या खांद्यावर घेण्याची चूक करणार नाहीत अशी खोचक टिका भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल यांनी केली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज