मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय काल दि.३१ डिसेंबरला जारी करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के मिळणारी सवलत आणखी वाढणार असल्याने सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येते.
ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर या अभियानांतर्गत मूल्यमापन केले जाते.

मूळ शासन निर्णयानुसार या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज्यातील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या होत्या.

त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींना प्रभावी सहभागाची संधी मिळावी आणि सुरू असलेल्या उपक्रमांची पूर्तता करता यावी, या हेतूने शासनाने कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन शासन निर्णयानुसार, ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी आता १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे.

यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














