मंगळवेढा : समाधान फुगारे
फडणवीस सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयाला महाविकास आघाडीच्या सरकारकडून स्थगिती देण्यात येत आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड रद्द केल्यानंतर आता सरपंच निवडही रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंच निवडला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा मागील सरकारने केला होता.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
परंतु या सरकारने तो कायदा रद्द केला आहे. मात्र ‘सरपंच जनतेतूनच निवडला जावा’ अशी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेची मागणी आहे. त्यामुळे सरकार रद्द करत असलेल्या निर्णयाला सरपंच संघटनेने विरोध केला आहे.
सरकारने हा निर्णय रद्द करू नये यासाठी सरपंच परिषदेने आंदोलन सुरू केले असून, आजच शेवगाव (जि.नगर ) येथे सरपंच परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.जनतेतून सरपंच निवडणे रद्द केल्यास सरकारला जागा दाखवू असा इशारा देण्यात आला होता.
शासनाने घेतलेला हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उद्यापासून महाराष्ट्रात उमटलेले दिसतील, असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
तत्कालिन फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवड व्हावी यासाठी मंत्रिमंडळात बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय आता ठाकरे सरकारने रद्द केला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाने आता यावर वादंग उठण्याची शक्यता व्यक्त केली जातीये.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज