टीम मंगळवेढा टाईम्स ।
“सुवर्णकार व्यावसायिकांचे संघटन ही काळाची गरज असून सर्वांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे” असे मत मंगळवेढा येथील गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स या पेढीचे सराफ जयदीप रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
यशस्वी सराफ व्यावसायिकांच्या यशोगाथा’ या विषयावर सुवर्णकार समाजाच्या राज्यस्तरीय महामंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
“सराफी व्यवसायात सचोटीने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. खरेदी विक्रीचे व्यवहार सरकारी नियम पाळूनच करायला हवेत. ग्राहकांचे हित आणि त्यांचा विश्वास या गोष्टी सुवर्णकार बांधवांसाठी मोलाच्या ठरतात.
सचोटीचा व्यवहार हाच या व्यवसायाचा यशस्वी मूलमंत्र आहे” असे विचार शिरोली, कोल्हापूर, येथील “कालिका ज्वेलर्स” या पेढीचे सराफ अविनाश मुखरे यांनी मांडले.
“ग्राहक हाच परमेश्वर” मानून त्यांना समाधानी कसे ठेवता येईल या गोष्टीवर भर द्यावा आणि युवा पिढीने स्पर्धेच्या जगात टिकून रहावे असे मत इंदापूर, जि.पुणे येथील सराफ संजयदादा बानकर यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा,जि.अहमदनगर येथील सराफ अनिलशेट धर्माधिकारी यांनी राजकारण आणि व्यापार या दोन्ही गोष्टी कष्टाने आणि प्रामाणिकपणाने काम केले तरच साध्य होतात असे सांगितले. ते स्वतः श्रीगोंदा येथे उपनगराध्यक्ष होते. त्यांची पेढी गेली ४० वर्षे कार्यरत आहे.
सराफी व्यवसायात पारदर्शकता, नाविन्याचा शोध,मुखात गोडवा, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात असे विचार उस्मानाबाद येथील चांदीचे होलसेल व्यापारी अविनाश पंडीत यांनी व्यक्त केले.
धनंजय क्षीरसागर ( मोडनिंब) प्रकाश पोतदार (काले) सुहास पंडित (देवराष्ट्रे) रवि पोतदार (इचलकरंजी) निलेश नायगांवकर (उस्मानाबाद) संजय माणकापुरे (हुपरी) आणि ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार उपस्थित होते. युवा व्याख्याते रामानंद तपासे (गेवराई) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
आश्लेषा पोतदार (अहमदनगर) यांनी सूत्रसंचालन, गौरव पोतदार (हुपरी) यांनी प्रास्ताविक तर विनायक पोतदार (कुंभोज) यांनी आभारप्रदर्शन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज