मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग ।
दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात पाणी पोहोचेपर्यंत पाणी संघर्ष चळवळ थांबणार नाही. ज्या भागांना पाणी मिळाले आहे, त्यांनी वंचित भागांसाठी पुढाकार घ्यावा, अपूर्ण सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी संघर्ष बळकट करावा, असे आवाहन शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना पाणी संघर्ष समितीचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.
मंगळवेढा येथे झालेल्या ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेत प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलत होते. या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. शिवाजीराव काळुंगे हे होते.

या परिषदेत अनेक मागण्या आणि जवळपास २० ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर वैभव नाईकवाडी, आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार राजेंद्र देशमुख, गौरव नायकवडी, डॉ. अनिकेत देशमुख,

दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, आनंदराव पाटील, प्रा. बाळासाहेब नायकवडी, अॅड. सुभाष पाटील, प्रा. सी. पी. गायकवाड, अॅड. सरफराज बागवान, प्रा. दत्ताजीराव जाधव, विश्वंभर बाबर, अॅड. भारत पवार, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज उपस्थित होते.

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, स्व. भाई डॉ. गणपतराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील, स्व. निळू फुले यांच्यासह अनेक नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे, म्हणून उभारलेल्या चळवळीमुळे टेंभू, म्हैसाळसह अनेक सिंचन योजना मार्गी लागल्या. भीमा, माण व कोरडा नदीवर बॅरेज उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार राजेंद्र देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, गौरव नायकवडी, प्रा. आर. एस. चोपडे, अॅड. सरफराज बागवान, प्रा. दत्ताजीराव जाधव, विश्वंभर बाबर, अॅड. भारत पवार, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव यांनी मनोगतातून जनतेच्या भावना अधोरेखित केल्या.

राज्यातील अपूर्ण प्रकल्पांना गती द्या
टेंभू, म्हैसाळ, सांगोला शाखा, उरमोडी, धोम, बलकवडी, निरा देवधर, ताकारी, राजेवाडी तलाव इत्यादी जे महाराष्ट्रातील २६ अपूर्ण प्रकल्प कामाला गती देऊन पूर्ण करावेत, टेंभूची सर्व कामे डिसेंबर २०१९ अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन होते, अपूर्ण कामे मुदतीत पूर्ण व्हावीत, अशी मागणी परिषदेत झाली.

पाणी परिषदेत वीस ठरावांवर झाली चर्चा
आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावे व वंचित जमिनीला प्रायोगिक तत्त्वावरती प्रत्येक शेतकऱ्याच्या किमान तीन एकराला पाणी मिळावे, वडापूर बॅरेजचे काम त्वरीत पूर्ण करावे.
मंगळवेढा तालुक्यातील 3 सिद्धापूर, तामदडर्डी व तांडोर या गावांना सिंचनाचा लाभ मिळेल, टेंभूचे पाणी माण नदीत वाडेगावपर्यंत आलेले आहे. ते माण नदीत वाडेगावपासून धर्मगाव बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे.
माण, भीमा व कोरडा नदीवरील बंधारे नियमितपणे पाण्याने भरून देण्यासाठी या नद्यांना कॅनालचा दर्जा देण्यात यावा. तसेच या तिन्ही नद्यांवर २ टी. एम. सी. पाणीसाठा होणारे बॅरेजेस बांधावे.
उजनीचे पाणी कॅनॉल बेड लेव्हलपर्यंत पाणी सोडावे, बेड लेव्हलपर्यंत धरणातील पाणी शेतीसाठी कॅनॉलमधून सोडण्यात यावे यासह परिषदेत विविध २० ठराव करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














