मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
भीषण उन्हाळ्याच्या झळा सोसणाऱ्या मंगळवेढेकरांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. उचेठाण जॅकवेल येथील मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
हा गाळ काढण्यासाठी नगरपरिषदेने ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे नेमकी अडचण?
नदीपात्रातील ‘इंटक वेल’मधून जॅकवेलमध्ये पाणी वाहून नेणारी पाईपलाईन गाळाने पूर्णपणे चोकअप झाली आहे. यामुळे पंपांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणी उपसा करणे अशक्य झाले आहे.

हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड आणि धोकादायक असल्याने प्रशासनाने २९ एप्रिलपासूनच गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

नगरपरिषदेचे आवाहन:
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, काम पूर्ण होईपर्यंत पंपिंग बंद राहील. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागात पाणी मिळणार नाही.
नागरिकांनी उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











