मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता विश्रांती घेतली.
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना येथे खेळवला जाणार आहे. पण, चाहत्यांना खूपच वाट पाहावी लागत आहे. पावसाने १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली.
पावसासोबत अहमदाबादमध्ये काही भागात गाराही पडल्या. मुसळधार पावसामुळे अखेर आज होणारा सामना स्थगित केला गेला अन् उद्या ही फायनल सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.
९ वाजता थांबला, परंतु १५ मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धो-धो पाऊस सुरू झाला आहे. अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच उद्या खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने आजचा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
अम्पायर रॉड टकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १२.०६ पर्यंत सामना होऊ शकला असता, परंतु त्यासाठी किमान एक तास आधी पाऊस थांबावला हवा होता. पण, ११ नंतरही पाऊस सुरू राहिल्याने हा निर्णय घेतला गेला.
राखीव दिवस असणार?
दरम्यान हे लक्षात घ्या की आयपीएल 2022 मध्ये अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस होता, अशातच यंदाही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होणार असून जर
या वेळेत पाऊस पडला तर 09.35 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. तसेच यानंतरही, जर हवामानाने फटका दिला तर 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ 11.56 पर्यंत असणार आहे.
एकही चेंडू न टाकल्यास काय होईल?
आज कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळला गेला नाही, तर सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे ला होणार आहे. समजा राखीव दिवसातही निर्णय झाला नाही, तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार होता.
कारण गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले असून चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान पटकावले आहे. अशातच एकीकडे गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले तसेच त्यांचा 0.809 चा नेट-रन रेट होता. तर दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते.
हे प्लेऑफचे नियम
आयपीएल खेळण्याच्या परिस्थितीनुसार, फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 सामना टाय राहिला तर आणि निकाल लागला नाही तर हे नियम लागू होणार आहेत.
16.11.1: अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी संघ सुपर ओव्हरमध्ये एकमेकांशी खेळतील
16.11.2: सामन्यात सुपर ओव्हर शक्य नसेल, आयपीएलच्या खेळण्याच्या परिस्थितीच्या परिशिष्ट एफ अंतर्गत विजेता निश्चित करण्यात येणार आहे. परिशिष्ट एफ नुसार, लीग टप्प्यात गुणतालिकेत जो संघ अव्वल असतो तो विजेता घोषित करण्यात येतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज