मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावातील हरी दगडू जाधव यांच्या शेतात मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास ज्या दुभत्या जरशी गाईच्या जोरावर संसाराचा गाडा सुरू होता, त्याच गाईवर वीज पडून दगावल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
मंगळवार दि ८ रोजी पहाटे २ वाजता वादळी वारा,विजांचा कडकडाट आणि परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याच वेळी आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि जाधव यांच्या मोकळ्या जागेत चरत असलेल्या जरशी गाईवर वीज कोसळली त्यात गाय जागेवर प्राण सोडली.
अचानक वीज कोसळल्याने ५० हजार किमतीची दुभती जरशी गाय दगावली.पहाटेची वेळ आणि पाऊस असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा करू शकले नाहीत.सदर घटनेचे पंचनामा करणार करून जाधव यांना सरकारी मदत लवकर मिळावी अशी मागणी संतोष पवार यांनी केली आहे.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावातील हरी दगडू जाधव यांच्या शेतात मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास ज्या दुभत्या जरशी गाईच्या जोरावर संसाराचा गाडा सुरू होता, त्याच गाईवर वीज पडून दगावल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
मंगळवार दि ८ रोजी पहाटे २ वाजता वादळी वारा,विजांचा कडकडाट आणि परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याच वेळी आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि जाधव यांच्या मोकळ्या जागेत चरत असलेल्या जरशी गाईवर वीज कोसळली त्यात गाय जागेवर प्राण सोडली.
अचानक वीज कोसळल्याने ५० हजार किमतीची दुभती जरशी गाय दगावली.पहाटेची वेळ आणि पाऊस असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा करू शकले नाहीत.सदर घटनेचे पंचनामा करणार करून जाधव यांना सरकारी मदत लवकर मिळावी अशी मागणी संतोष पवार यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज