टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळे लॉकडाउन झाले. यामुळे अनेकांची रोजी रोटी गेली, आर्थिक संकट निर्माण झाले. यावर मात करण्यासाठी शासनाने नवनवे उद्योग निर्मितीत पाऊल टाकण्यासाठी दिलासा म्हणून मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली आहे.
यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हाभर जनजागरण मोहीम घेतली आहे. ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे . त्याला २५ ते ३५ टक्के सवलत मिळणार आहे.
पुणे , मुंबईला नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेकांना गावी परतावे लागले. कुशल तंत्र अवगत असताना पैशांमुळे अनेकांना हताश व्हावे लागत आहे.
हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक विभागास जनतेने स्वावलंबी बनावं, यासाठी योजना सुरू केल्या. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्राकडे मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू झाली आहे.
या मोहिमेचा अधिक प्रसार होण्यासाठी तालुकास्तरावरील तहसील, पंचायत समिती अशा शासकीय कार्यालयात डिजिटल बॅनर लावण्यात येत आहे.
या योजनेच्या अटी, शर्थी याची माहिती यात देण्यात आली आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या योजनेद्वारे उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत अर्ज करता येतो. सेवा उद्योगासाठी जास्तीत जास्त १० लाख मर्यादपर्यंत अर्ज करता येतो.
शहरी भागासाठी अनु . जाती , जमाती , महिला अपंग , माजी सैनिकांसाठी २५ टक्के आणि अन्य प्रवर्गासाठी १५ टक्के अनुदान आहे.
ग्रामीण भागासाठी २५ ते ३५ टक्के अनुदान मिळते. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .(स्रोत:लोकमत)
कर्ज प्रस्तावासाठी ‘ही‘ कागदपत्रे हवीत
या योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी फोटो, आधार कार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, हमीपत्र , जाती/जमातीचा असल्यास जातीचे प्रकल्प अहवाल, लाभार्थी अनुसूिचत प्रमापत्र, विशेष प्रवर्ग असेल तर अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि लोकसंख्येचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
काय आहे पात्रता
कोणतेही स्थानी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ पूर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्षे ( अनु . जाती / जमाती , महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी ७ वर्षे शिथिल असेल.
स्वावलंबी व्हावेत , रोजगार मिळावा या अनुषंगाने ही महत्त्वाकांक्षी योजना
अर्जदाराने अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण आणि २५ लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे.
कोरोना कालावधीत अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. यातून ते बाहेर पडावेत . स्वावलंबी व्हावेत , रोजगार मिळावा या अनुषंगाने ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने अंमलात आणली आहे. याचा लाभ घ्यावा. – अनिलकुमार साळुंखे , व्यवस्थापक , जिल्हा उद्योग केंद्र , सोलापूर .
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज