मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरतीएवजी कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील. पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत केली.
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे.
यु-डायस (UDISE) प्राणलीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.
कंत्राटी पद्धतीला विरोधकांचा आक्षेप
मंत्री दादा भुसे यांनी कंत्राटी पद्धतीने भरतीची घोषणा केल्याने विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची कायमस्वरूपाचीच झाली पाहिजे. अशी मागणी करत विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला.
तसेच मंत्री दादा भूसेंकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळामध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरुपी भारती झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज