टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याने आणि दहावी- बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
३ मार्च रोजी शिक्षण समितीची बैठक होणार असून त्यावेळी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात झेडपीच्या दोन हजार ७९६ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये एक लाख ५० हजार ३४८ मुले प्रवेशित आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळा खूपच विलंबाने सुरू झाल्या आहेत.
१ फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या, परंतु आता उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही, त्यांची गैरहजेरी वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (जिल्हा परिषद) सकाळच्या सत्रात भरविली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे सभापती, समिती त्यासंबंधीचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत घेतील. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात काहीच सांगितलेले नाही.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सकाळी साडेदहा वाजताच सुरू होणार असल्याने पाचवी ते नववीच्या मुलांच्या शाळांबाबत ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(स्रोत:सकाळ)
उन्ह वाढू लागले असून शाळेची वेळ सकाळी
दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरविली जाते. आता उन्ह वाढू लागले असून शाळेची वेळ सकाळी करण्यासंदर्भात ३ मार्च रोजी शिक्षण समितीत अंतिम निर्णय होईल. – किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज