मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पहलगाम हल्ल्यानंतर झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर पाकिस्तानसोबत झालेला संघर्षाची अखेर शस्त्रसंधीमध्ये झाली. गेल्या २० दिवसात झालेल्या या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशवासियांना संबोधीत करून भारताची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट केली.
पंतप्रधान मोदींनी गेलेल्या २५ मिनिटांच्या भाषणात फक्त पाकिस्तानला इशारा दिला नाही तर संपूर्ण जगाला देखील सांगितले की, भारताने दहशतवादी कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानकडून पुन्हा काही गडबड झाली तर भारत त्याला चोख उत्तर देईल
आता फक्त दहशतवाद, पीओकेवरच चर्चा होईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला मोठा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ला आणि शस्त्रसंधी उल्लंघनावरून पाकिस्तानवर तोफ डागली. पाकिस्तानच्या भूमिकेवर पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दात टीका केली. युद्धविरामानंतर आता चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर होईल, अशा कठोर शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.
पाकिस्तानच्या हल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. पाकिस्तानातील दहशतवादी आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींनी मोठं भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर प्रत्युत्तर देऊ. त्या जागेवर जाऊन कठोर कारवाई करू, जिथे दहशतावादाचं मूळ आहे’
‘अणुहल्ल्यावरून ब्लॅकमेल करणे भारत खपवून घेणार नाही. भारत लक्ष्यभेद करणार, निर्णायक प्रहार करणार. दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवादी म्होरक्यांना वेगवेगळे पाहणार नाही.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाकिस्तानचा खरा चेहरा बघितला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अत्यंयात्रेला मोठेमोठे अधिकारी उपस्थित होते. हा मोठा पुरावा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी नेहमीच पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं आहे. आपल्या क्षमता दाखवून दिली. श्रेष्ठता सिद्ध केली. या ऑपरेशनदरम्यान भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात सगळ्यांची एकजूट राहणे, एकता ही सर्वात मोठी ताकद आहे, असे पंतप्रधान मोदी पुढ म्हणाले.
‘निश्चितपणे हे युग युद्धासाठी नाही. पण हा युग दहशतवादाचाही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स हा एक चांगल्या युगाची हमी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतंय.
ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. जर त्यांना वाचायचं असेल तर त्यांना दहशतवाद नष्ट करावं लागेल. शांततेचा दुसरा कोणताच मार्ग नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगाला सांगतो की, आमची घोषित नीती आहे की, जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवादावरच होईल. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पीओकेवरच होईल, असे मोदी म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज