टीम मंगळवेढा टाईम्स
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.
या राज्यातील कष्टकरी, शेतकरी यांना सुखी ठेवण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यात येत्या काळात मोठे उद्योग येणार आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, आमदार समाधान आवताडे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.
कार्तिकीसाठी चंद्रभागातीरी वारकऱ्यांची मांदियाळी, पंढरीत 4 लाखांहून अधिक भाविक दाखल
कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेला कार्तिकी सोहळा यंदा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे या सोहळय़ाला दशमीच्या दिवशीच पंढरीत 4 लाख भाविक दाखल झाले आहेत.
LIVE | Media interaction in #Pandharpur #एकादशी #Ekadashi #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Maharashtra https://t.co/KiZsm4h5AX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2022
आज एकादशीला किमान 6 ते 7 लाख भाविक दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेकडो दिंडय़ा पंढरीत दाखल झाल्या आहेत. चंद्रभागातीरी वारकऱयांची मांदियाळी जमली असून, पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे.
स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गर्दी करीत आहेत. मुख दर्शन, कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराकडे येत आहेत,
तर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागत आहे. दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत उभी करण्यात आलेली आहे,
तर 65 एकर जागेवर 2 लाखांहून अधिक भाविक तंबू, राहुटय़ा उभारून वास्तव्य करीत आहेत. मठ, मंदिर, धर्मशाळा, शिक्षण संस्था आदी ठिकाणी भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी
श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असलेले भाविक दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे.
येथील दहा दर्शन शेडपैकी 7 दर्शन शेडमध्ये भाविकांची रांग पोहोचली आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांग असल्याने भाविक रांगेत उभे राहत आहेत. दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी लागत आहे. आज एकादशीच्या मुख्य सोहळय़ादिवशी दर्शनरांग शेडच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे.
चोऱया रोखण्यासाठी वारकऱयांच्या वेशात पोलीस
यंदाच्या कार्तिकी यात्रेत 6 ते 10 लाख भाविक येतील, असा अंदाज असल्याने पोलीस विभागाकडून भाविकांना संरक्षण देण्यासाठी चोऱया, सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी वारकऱयांच्या वेशामध्ये 50 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर 125 सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे.
जादा एसटी बसेसची सोय
कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे 1500 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे आर्थिक तोटय़ात आलेल्या महामंडळाला आर्थिक फायदा होणार आहे. रेल्वेनेदेखील जादा रेल्वे गाडय़ांचे नियोजन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज