mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2021
in राज्य, मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतो म्हणणारे व पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला नाही असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील आठवडा बाजार येथे आयोजित सभेत बोलत होते.

व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, श्रीमंत कोकाटे, उमेदवार सचिन शिंदे, दत्तात्रय गणपाटील,अँड.राहुल घुले, दामाजी कारखान्याचे माजी संचालक श्रीधर खांडेकर,श्रीमंत केदार, संदीप कारंडे,बीड पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे,विठ्ठल कारखान्याचे संचालक बागल,राजाराम सावंत,दयानंद पाटील, संजय बेडे,हर्षद डोरले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, दिगवंत भारत भालके यांना उमेदवारी देण्यासाठी राजाराम सावंत त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते मी उमेदवारी दिली ते विजयी झाले पण निवडून आलेल्या तिसऱ्याच दिवशी ते दुसऱ्या पक्षात गेले. आजपर्यंत विकास केला म्हणणारे एकानेही विकास केला नाही.

35 गावाला पाणी आणणार म्हणून अजून आणले नाही ते पुन्हा म्हणतात आता नक्की आणणार अरे जनतेची किती दिशाभूल करचाल, पाणी मागून मिळणार नाही ते हिसकावून घेण्याची धमक असणाऱ्याच पाणी मिळणार आहे. त्यासाठी सचिन पाटील निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले.

शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत म्हणून विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती आणली तरीदेखील जिल्हाधिकारी जप्ती करत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावापोटी ही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात शेतकरी महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने का मदत केली नाही. शेतकऱ्यांच्या जिवालाच्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाहीत, एकदा मतदान झाले की लॉकडाउन लागू करणार शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार , दुधाचे,डाळींबाचे ,द्राक्षाचे या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्याना सूट देणार होते,सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही आता कुठे केले .. काय झाले. या राज्यातील गरीब जनतेसाठी या सरकारने काय केले, ऊस तोडणी मजुरांसाठी काय केले,हमाली करणाऱ्या नागरिकांसाठी काय केले या सरकारने यांचा विचारच केला नाही.

इथले नागरिक बेरोजगार युवक कामासाठी बाहेर गावी जात आहेत यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुम्ही काय केले , शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा, केळी बागा उध्वस्त झाल्या सरकार मधील मंत्री कुठे गेले फक्त प्रचार करून जात आहेत.

पैसे नाहीत म्हणणारे सरकार स्वतःच्या मंत्र्यांसाठी किती खर्च गाड्या घेतल्या घरे बदलली शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणता एक चोर साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. न्याय भीक मागून मिळत नाही, मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा लागतो. क्रांती घडवण्यासाठी सचिन पाटील यांच्यात धमक असल्याचे त्यांनी सांगितले

उमेदवार सचिन शिंदे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मध्ये नव्या परिवर्तनाची लाट आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केलेल्या होत्या त्यातील एकही घोषणा यांनी पूर्ण केली नाही.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, पीक कर्ज देणार होते, पीक शेतात असताना लाईट कट करण्याचे पाप यांनी केले आहे. गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लॉक डाउन काळात शेतकऱ्यांना, महिलांना एका रुपयाची ही मदत केली नाही.

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांचे बिल दिले नाही जनता त्यांना पाडल्या शिवाय राहणार नाही. कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत, ऊसाची देणी त्या मगच मत मागाला या अशी भूमिका घेतली.

आमदार पुत्र हे वारसा हक्क सांगून आमदारकी मागत आहेत.त्यांनी शेतकरी व गरीब लोकांसाठी काय काम केले शेतकऱ्यांना लुटण्याचे काम यांनी केले आहे. 19 हजार शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला आहे.त्यामुळे त्यांचे सभासदत्व कायम राहणार आहे.

35 गावचे पाणी म्हणजे निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला झाला आहे. आजपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने तेथील जनतेला फसवले आहे. ज्या बारामती करांनी तुमचे पाणी चोरले आहे तेच आज इथे येऊन पाणी देतो म्हणतात ते पाणी काय देणार नाहीत म्हणून नागरिकांनी त्यांना घरी बसवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

रविकांत तुपकर बोलताना म्हणाले की, अन्याय करणाऱ्यांचे मुस्काट फोडा अशी शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांना राजू शेट्टी यांनी पाहिली उमेदवारी दिली होती. माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक आहे.त्यामुळे जनतेने योग्य उमेदवार कोण आहे ते ओळखून मत द्यावे.

प्रेमापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराला आले आहेत अशा भ्रमात राहू नका,ते विठ्ठल साखर कारखाना हडप करण्यासाठी आले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत त्यानी आंदोलने केली म्हणून त्यांना तुरंगात टाकले. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर हा राजू शेट्टी यांच्यामुळे दिला जात आहे.

पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत.ही जनता त्यांना योग्य जागा दाखवून देईल , हवा वरून कुणाची ही दिसत असेल पण खरी हवा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांची 46 कोटी एफ आर पी आणली पण बिल अदा न करता स्वतःसाठी ठेवले निवडणूक लढवत आहेत.

2009 साली दिगंवत आमदार भारत भालके यांनी सांगितले होते, राजा का बेटा राजा नाही होता, जो काबिल है वही हाकदार बनेगा मग आता ही घराणेशाही कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

श्रीमंत कोकाटे बोलताना म्हणाले की, सचिन शिंदे हे जनमताचे उमेदवार आहेत.राजू शेट्टी यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी देऊन शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे भूमिका त्यांनी पार पाडली आहे.

जुलमी किसान कायद्याच्या विरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

लोकशाही ठिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.राष्ट्रवादीत बडे नेते भिडे गुरुजी यांचे जवळचे आहेत त्यांनी अनेक हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारराजू शेट्टी

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Next Post
राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रवादीची जागा धोक्यात! एका समाधान आवताडेंना पराभूत करण्यासाठी निम्मं मंत्रिमंडळ मतदारसंघात

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा