टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील
हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचे आज समोर आले आहे. लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून सध्या ४८ लम्पी बाधित जनावारांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ७२ गाय/बैल व एक म्हैस अशा ७३ जनावारांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी २३ गाय व १ म्हैस, अशी एकूण २४ जनावारे बरी झाली आहेत. सद्य:स्थितीत ४८ गाई लम्पी बाधित आहेत.
आतापर्यंत ४२ हजार ८९१ जनावारांना लसीकरण झाले आहे. जिल्ह्यासाठी सध्या लम्पी लसचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात बाधित जनावरे
माळशिरस तालुक्यात ४९, सांगोला तालुक्यात ११, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, माढा तालुक्यात ५, मंगळवेढा तालुक्यात १, पंढरपूर तालुक्यात २ व बार्शी तालुक्यात १ लम्पी बाधित जनावर आढळले आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज