टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरासाठी नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली असून यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळणार आहे. चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा नगरपरिषद व मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नागरी सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, कार्यालय अधिक्षक विनायक साळुंखे, जेष्ठ पत्रकार दिगंबर भगरे, मंगळवेढा टाईम्सचे संपादक समाधान फुगारे, दावल इनामदार, आदित्य मुदगुल,सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे आदीजन उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी संपूर्ण शहरास कॉल देऊन यंत्रणेचे स्वागत व सुरुवात केली.
नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्व नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात या यंत्रणेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
गेल्या नऊ वर्षात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्हयातील 3 हजार 500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.
परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये –
संपुर्ण स्वयंचलित यंत्रणा गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत संपुर्ण भारतासाठी एकच टोल फ्री नंबर 18002703600 यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात
संपूर्ण परिसराला सावध करु शकतो संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश काॅल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो दुर्घटनेेचे स्वरुप,तीव्रता,ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबध्द मदत करता येते नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात नियमबाहय दिलेले संदेश,
अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत एका गावात चोरी करुन चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो
घटनेच्या तीव्रतेनुसार काॅल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकांचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना,आदेष देता येणे शक्य होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज