टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात लॉकडाऊन अंतर्गत निर्बंध कमी करून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यासाठी व्यापार्यांनी उठाव सुरू केला आहे. याअंतर्गत आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. यामुळे उढाढाल ठप्प होऊन व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. दुसरीकडे कामगारांनाही रोजंदारी गमवावी लागल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तरीही 31 मेपर्यंत सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध सहन केले.
मंगळवेढा शहरात व्यापारी 15 दिवसाचा जनता कर्फ्यु पाळण्यात आला त्यामुळेच आता शहरात कोरोनाची साथ कमी झाली आहे. त्यामुळे परिस्थिती ही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी पूरक आहे. यामुळे शासन, प्रशासनाने व्यापार्यांना वेठीस धरू नये. कोरोना नियमांचे पालन करून वेळेचे निर्बंध पाळत सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यापारी संघटनांनी मागणी केली आहे.
आज सकाळीच सर्व व्यापार्यांनी प्रांत कार्यालयात आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनादरम्यान पदाधिकार्यांनी प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली. पण शासनाच्या आदेशाशिवाय दुकाने उघडण्यास परवानगी नाही, असे सांगितले. त्यामुळे व्यापार्यांच्यात संतापाची लाट उसळली.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड,सचिव अरुण किल्लेदार,जयदीप रत्नपारखी,अजीम शेख,यशवंत चव्हाण,जमीर इनामदार,संतोष बुरुकुल,सतीश दत्तू,सतीश हजारे यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.
दुकाने उघडण्याचा निर्णय लवकर घ्यावा : व्यापारी
दोन महिने दुकाने बंद ठेवून उपासमारी आणि कर्जाच्या हप्त्यांची भीती निर्माण झाली आहे. कामगारांना आम्ही कुठले पगार देणार? शहरात कोरोनाची साथ कमी झाली आहे. निकषांनुसार इतरत्र दुकाने खुली झाली, मग मंगळवेढ्यात काय अडचण? त्यामुळे शहर अनलॉकबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज