टीम मंगळवेढा टाईम्स ।
1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना व नंतर रूपांतरित झालेली राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शुक्रवारी सकाळच्या सत्रात तहसील कार्यालय मंगळवेढा येथे कर्मचाऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जुनी पेन्शन लागू करणेबाबत निवेदन तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे मंगळवेढा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी दिली.
राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीसंघटना , जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी गट ड महासंघ आयोजित केलेल्या या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सहभागी झालेली असून 1 नोव्हेंबर 2005 नंतर मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची हेळसांड तातडीने थांबविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्यसमन्वक दिगंबर तोडकरी यांनी दिली.
संजय चेळेकर,सुरेश पवार,ज्योती कलुबर्मे,विठ्ठल पाटील ,धनंजय लेंडवे, यांनी जुनी पेन्शन विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी शाम सरगर,विठ्ठल ताटे, संभाजी तानगावडे, सिध्देश्वर सावत, भाऊसाहेब माने,सतीश लेंडवे,अमित भोरकडे,विशाल जाधव,अनिल दत्तू,नागेश धनवे,विशाल गायकवाड,रोहन भोसले,शिवाजी बेलभंडारे,सुशेन क्षिरसागर,संदिप माळी,सूर्यंकांत जाधव,
जमीर काझी, सिध्देश्वर पवार,बळीराम उन्हाळे,कौशल्या दवले,तहसीन शेख,सिध्दाप्पा कोळी,प्रकाश पवार,दत्तात्रय कारंडे ,नंदू डांगे व कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज