टीम मंगळवेढा टाईम्स ।
करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेले शहरी व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आणि ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आज दि. 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
आज जिल्ह्यातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्यामुळे आज शाळेची पहिली घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे.
मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलं घरीच आहेत. पण सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा शाळा सुरू होण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.
दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे साेलापूर जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंत सर्वच शाळा सुरू होणार आहे.
प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साह आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे.
करोनाचे सावट अद्यापही असल्याने शाळांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असून, सोशल डिस्टन्स ठेवून मुले बसवण्याचे नियोजन करण्याची सूचना आहे.
कोठेही गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
शाळांना अचानक भेटी देऊन उपाययोजनांची पाहणी करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज